19/02/2025
वसंत ऋतूचे आगमन व उन्हाळा सुरू झाला की सह्याद्री पर्वतरांगेतील डोंगरांना वणवे लावण्याचे प्रकार सुरू होतात.
काटेसावर,करवंद , पळस, पांगारा, शिरीष, इत्यादी अनेक वृक्ष वसंत ऋतू मध्ये फुलून येत असतात. या फुलोऱ्यावर अनेक प्रकारचे पक्षी, वन्यप्राणी, फुलपाखरे, मधमाशा, किटक इत्यादी अनेक प्रकारचे वन्यजीव आपली भुक भागवत असतात.
अवघ्या सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये फुलोऱ्याच्या सुवासिक फुलांनी घमघमाट पसरण्यास सुरवात झालेली असते.
पण काही विघ्नसंतोषी, दुष्ट लोकांची वणवा लावण्याची वृत्ती या सौंदर्याची राखरांगोळी करते.
वणव्यामध्ये अनेक पक्षी त्यांची घरटी, त्यांची पिलं, अनेक प्रकारची फुलपाखरे, अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी, ससे, हरणभेकर इत्यादी अनेक प्राणी जळून किंवा भाजून जातात.
वणवा लावणाऱ्या लोकांना माझे सांगणे आहे. कि तुम्ही आज जरी वणवा लावत असाल तरी भविष्यकाळातील तुमच्या-आमच्या पिढ्यांचे भविष्य जाळत आहात.
कारण येणाऱ्या ५ ते १० वर्षात निसर्ग वाचवण्याचे सारे प्रयत्न अपुरे पडणार आहेत.
वणवा लावणाऱ्या लोकांना मी
कळकळीची विनंती करतो, कि
आपल्याला प्राणवायू देणारी बेटे,
आपल्या लहान मुलांना रानमेव्याची मेजवानी देणाऱ्या या रानमेव्याचा खजिना वणव्यात जाळून भस्म करु नका.
आपला .
प्रशांत बाळासाहेब डोंगरे