21/08/2017
चिंतामणि गणपति,हिंगोली व्यवस्था
दर वर्षी प्रमाणे या हि वर्षी श्री चा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे.
हिंगोली येथील सर्व दूर, देश भर ख्याती प्राप्त झालेल्या श्री विघनहर्ता चिंतामणी गणपतीचा वार्षिक उत्सव मोठ्या थाटा माटात साजरा केला जाणार आहे.
गत वर्षी प्रमाणे या हि वर्षी स्थापना दिनी श्री ची पालखी मिरवणूक सकाळी १२ वा निघून शिवाजीनगर, पोस्ट ऑफिस, जवाहर रोड, गांधी चौक, महावीर स्तंभ, श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मार्गाने मंदिर पर्यंत जाईल.
पालखी मिरवणुकीत भजनी मंडळ, घोडे, बँड पथक अशी भव्य मिरवणूक राहील.
दर वर्षी अनंत चतुर्थीला लाखो भाविक श्रीच्या दर्शना करिता हिंगोलीत दाखल होतात.
या उत्सवात संपूर्ण हिंगोलीकर सहभागी होतात.
|| नगर परिषदे अभिनंदन ||
महावीर स्तंभ ते गिरीष मेडिकल ते जुने ग्रामीण पोलीस स्टेशन ते गोपाल अग्रवाल यांचे घर ते श्री चे मंदिर ह्या मार्गाला हिंगोली नगर परिषद मध्ये श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मार्ग असे नामकरण करण्यात आल्याचा ठराव घेण्यात आला तसेच हे संस्थान 'क' दर्जा तीर्थक्षेत्र मध्ये समाविष्ट करण्याकरिता देखील ठराव घेतला म्हणून नगराध्यक्ष, मुख्याधिकारी सर्व नगरसेवक यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
दर वर्षी दर्शनाच्या कपडा गल्ली, जिनगर गल्ली व मेडिकल लाईन अश्या तीन रांगा लागत होत्या, त्या मध्ये रेटा रेटी, चेंगरा चेंगरी व्हायची. या वर्षी भाविकांना त्रास होऊ नये म्हणून श्री रामलीला मैदान येथे (५००००) पन्नास हजार भाविक थांबू शकतील असा भव्य दिव्य वॉटर प्रूफ मंडप तयार करून त्या ठिकानाहून एकच रांग श्री विघनहर्ता चिंतामणी गणपती मार्गाने सतत चालू राहील. श्री रामलीला मैदान हे महसूल विभागाने उपलब्ध करून दिल्या मुळे भाविकांची चांगली सोय होईल
या वर्षी, श्री चे मंदिर ते श्री रामलीला मैंदान पर्यंत ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करण्यात आली आहे.
श्री रामलीला मैदान वरील मंडपात दोन मोठे LED वॉल, महावीर स्तंभ येथे एक LED वॉल व जुने ग्रामीण पोलीस स्टेशन येथे एक LED वॉल लावण्यात येणार आहेत. श्री च्या मंदिरातील व इतर सर्व ठिकाणचे थेट प्रक्षेपण या LED वॉल वर करण्यात येणार आहे. त्या सोबतच अनुचित प्रकार घडू नये म्हणून सगळी कडे CC TV कॅमेरे देखील लावण्यात येणार आहेत.
पोलीस विभागाला मदत होण्यासाठी या वर्षी संस्थानने स्वतःचे वायरलेस सेट खरेदी करण्याचे ठरवले आहे.
ह्या वायरलेस सेट वरून सगळी कडे संपर्क करता येईल तसेच वाकी टॉकी वरून थेट ध्वनिक्षेपका वर देखील सूचना देता येतील.
हिंगोली शहर हे हागणदारी मुक्त झाले आहे म्हणून नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दहा फिरते सौचालय देण्याचे मान्य केले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक भागातील कार्यकर्त्यांची स्वयंसेवक म्हणून नेमणूक केली जाणार आहे. असे जवळपास तीनशे ते सातशे स्वयंसेवक काम पाहतील.
या कार्यक्रमात अनेक भाविक अन्नदान करतात. आपल्या शहरात स्वछता रहावी म्हणून दर्शन रांगेत संस्थानच्या वतीने कचरा कुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे, सर्व भक्तांनी त्याचा उपयोग करावा अशी विनंती करण्यात येते.
श्रींची कावड सकाळी ५:३० वा निघून मंदिरात ८:०० पर्यंत येईल. या वर्षी मुख्य आरती सकाळी ८:४०ला सुरू होईल. ९:०० वा प्रसादाचे मोदक वाटपास सुरुवात होईल.
या वर्षी संस्थानच्या वतीने २ लाख मोदक वाटप होणार आहे. शहरातील गणेश भक्त महिला व रमाकांत मिस्किन हे काम करत आहेत.
बाहेर गावाहून आलेल्या भाविक भक्तांकरिता मंदिर समितीच्या वतीने टाले हॉल व श्री राजस्थान व्यायाम शाळेच्या वतीने अग्रवाल बालाजी मंदिर येथे अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
बाहेर गावाहून आलेल्या वाहना करिता, श्री रामलीला मैदान, एन टी सी व पोलीस मैदान येथे वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
बाहेर गावाहून आलेल्या भाविकांची मुक्कामाची व्यवस्था श्री गोपाल लॉज येथे करण्यात आली आहे.
स्थानिक भाविकांनी दर्शना करिता सायंकाळी ६:०० च्या नंतर यावे असे आव्हान करण्यात येते.
ज्या भाविकभक्तांना अन्नदान करायचे असेल त्यांनी श्री रामलीला मैदान येथील मंडप जवळ करावे असे आव्हान करण्यात येत आहे.
सर्व भाविकांना विनंती आहे, आपला परिसर स्वच्छ ठेवावा, कुठे काही अनुचित प्रकार होत असेल तर लगेच मंदिर समितीच्या विश्वस्तांच्या किंवा पोलीस प्रशासनाच्या लक्षात आणून द्यावे.
सुरक्षेच्या दृष्टीने, बेवारस पिशवी, किंवा काही आढळून आल्यास लगेच पोलीसला कळवावे.
महावीर स्तंभा जवळ श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर व बजरंग दलच्या वतीने चप्पल स्टँड राहील याची नोंद घ्यावी.
हा कार्यक्रम आता फक्त एका संस्थानचा राहिला नसून संपूर्ण हिंगोलीकरांचा झाला आहे, म्हणून सर्वानी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य असे आव्हान दिलीप बांगर, रमाकांत मिस्किन, कृष्णमुरारी मंत्री, बद्रीनारायण मुंदडा, सुरेश घन, अनिल बिडकर, सचिन घन,मिलिंद राजूरकर, विजय धनमने, सतिष लोहिया, मनोज दावनगिरे, राम अग्रवाल, किशोर मिश्कीन, प्रेमलाल जैस्वाल, योगेश घन,बालाजी कामटलवार, अजय घाटोळे, गजानन घाटोळे, विक्रम पांडे, सल्लागार - नि. प्रा. डॉ विलासराव डोईफोडे, मुरलीधर मुंदडा, चंद्रकांत डोईफोडे व शे. पाशा शे दिवान, सुरेशराव डोईफोडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.