28/10/2020
महापूर आठवतो का? कसा विसरणार? कोल्हापूरच कोल्हापूरच्या मदतीला धावून आलं होतं. हीच आपली संस्कृती आहे! हीच आपली खासियत!
काही होऊ दे मी हाय की!!!
असंच एक संकट कोल्हापूर वर घोंगावत आहे
कोल्हापूर शहर आणि आसपासच्या भागात 15 लाख लोक राहतात. पण निरोगी आणि ॲक्टिव्ह ब्लड डोनर ८००० आहेत जे फक्त तीन महिन्यातून एकदा रक्तदान करू शकतात. आणि महिन्याला आपल्याला किती बॉटल रक्त लागते? 6000!!!
कोरोना काळात लोकांनी रक्तदान कडे पाठ फिरवली. आता कोरोना चा ओस कमी झाल्यामुळे, राहिलेल्या सगळ्या शस्त्रक्रिया आता चालू होतील. वाहतुकीमुळे ॲक्सिडेंट ही वाढताहेत. सीमेवरती युद्धजन्य परिस्थिती आहे. आणखी पुढील नैसर्गिक आपत्ती कधी येईल याचा नेम नाही.
आणि आपण यासाठी तयार नाही.
पण घाबरू नका, मी हाय की!!!
कोल्हापुरातल्या विविध क्षेत्रातील तरुणांनी एकत्र येऊन एक उपक्रम राबवला आहे. महामारी च्या काळात सुरक्षिततेची आणि आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन, एक आदर्श रक्तदान शिबिर कसं असावं हे आपल्याला येत्या शुक्रवारी आणि शनिवारी कळणार आहे. सोशल डिस्टंसिंग आणि सनिटायझेशन याची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे.टेक्निशन उपकरण volunteer आणि ब्लड डोनर यांच्या सुरक्षिततेची काळजी चार तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली होणार आहे.
रक्त देताना आणि घेताना, आपण सज्ञान असावं, आपली फसवणूक होऊ नये म्हणून रक्तदान बरोबरच आपल्याला उपयुक्त अशी माहितीही मिळणार आहे.
चला तर मग भेटूया 30 आणि 31 ऑक्टोबरला धैर्यप्रसाद हॉल,ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे!
वेगवेगळ्या क्षेत्रातील अनामिक तरुणांनी स्वयम्स्फूर्तीने एकत्र येऊन एक पूर्ण निस्वार्थी असा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे!!! आपली त्याला साथ लाभेल अशी आशा आहे.
भेटूया येत्या शुक्रवारी!!
मी हाय की!!!!