वृंदावन हॉस्टेल

वृंदावन हॉस्टेल This is page for all students who ever connected with Vrundavan hostel of C.O.V.A.S., Parbhani. Shar

03/07/2017
सर्व मिञ-मैञीणींना दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा
28/10/2016

सर्व मिञ-मैञीणींना दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा

12/05/2016

सर्व चार चाकी वाहनांच्या मालकाना आवाहन:
जून महिन्यात आपण परगावी जाताना आपल्या गाडीत खालील गोष्टी सोबत असू द्या.
१. छोटा खड्डा घेण्यासाठी खुरपे, टिकाव किंवा जाड लोखंडी सळई.
२. गावराण आंब्याच्या कोयी, चिचोके, लिंबोळ्या, बदाम, सीताफळ, किंवा कोठल्याही बहुवर्षिय झाडांच्या बिया
अ. प्रवासात टप्याटप्यावर गाडी थांबवा
ब. रस्त्याच्या कडेपासून सुमारे ५-६ फूट दूर सोबत घेतलेल्या लोखंडी हत्याराने फक्त ४-५ इंच खोल खड्डे घ्या.
क. त्या खड्यात २ बिया टोचून खड्डा मातीने झाका. व माती थोडी दाबा.
ड. सुमारे २५-३० फूट अंतरावर बिया टोचण्याचे कार्य रीपीट करा.
(टीप: ८-१५ दिवसानंतर जरी पाऊस पडला तरीही जमिनीत गाडलेल्या बिया जास्त करून रूजतात.)
(@टीप: आपण बिया सोबत न्यायला विसरलो तर या पिरीयेड मध्ये गुलमोहोर, रेनट्री, अकेशिया व तत्सम झाडांच्या बिया खाली पडलेल्या मिळतात, ती गोळा करून वापरू शकाल)
( #टीप: स्वानुभवानुसार सर्वात जास्त 'चिचोके' सोयीचे होत.)
झाले. पाऊस पडले की बिया रूजविण्याचे कार्य निसर्ग करेल. रस्ते ४-६ पदरी करताना काढावे लागलेले वृक्ष पुन्हा उगवतील. जास्तीत जास्त लोकांनी मनावर घेतल्याल वसुधा पुनश्च सुजलाम सुफलाम होईल. गरज आहे थोडीशी मेहनत घेण्याची.
कार्बन कमी होवून उष्णता कमी होईल. सावली क्षेत्र वाढेल. पर्जन्यमान वाढेल. पर्यावरणाचा, सृष्टीचा अशाप्रकारे आपण विमा उतरवू शकतो.
कल्पना आवडली असल्यास इतर ग्रुप्सना फॉरवर्ड करा. धन्यवाद

26/04/2016
06/05/2015

Kindly read the following passage carefully, you don't have to answer the questions.
सुट्टीत तुम्ही एखाद्या पर्यटनस्थळी मजा करताय...तिथून एफबीवर, व्हॉटसअॅपवर स्टेटस अपडेट करताय...फोटो टाकताय. पण तुमचं हे अति सोशल अपडेटिंग तुमच्या सोशल नेटवर्किंगवर नजर ठेवून असलेल्या स्मार्ट चोरांनाही अपडेट करतं हे तुम्हाला माहितीय का?
प्रकरण एक
'ऑन गोवा टूर विथ फॅमिली' असं विमानतळावरील चेक इन पडल्यानंतर काही तासातच त्यांच्या घरी चोरी झाली. चोरांना अटक झाल्यानंतर, कॉमन फ्रेंडच्या अॅक्टिव्हीटीमुळे हे घर रिकामी असल्याचं चोरांना समजल्याचं समोर आलं.
प्रकरण दोन
'वाढदिवसाला हिऱ्याची अंगठी मिळालीय, उद्या शाळेत घालून येईन.' हे स्टेटस एका मुलीनं एफबीवर टाकलं होतं. दुसऱ्याच दिवशी शाळेतून घरी येताना तिच्या फेसबुक फ्रेंडनं अंगठी लुटून नेली.
प्रकरण तीन
आजीला दागिने मोजण्यात ती मदत करत होती. दागिन्यांचा फोटो तिनं फेसबुकवर 'फिलींग रिच'च्या कॅप्शनसहीत अपलोड केला. आणि त्याच रात्री तिच्या आजीच्या घरी चोरी झाली.
प्रकरण चार
एका जाहीर कार्यक्रमाला अमुक ठिकाणी जातेय हे तिच्या फेसबुक स्टेटसवरून कळलं. चोरांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी फोन करून त्याची नेमकी वेळ जाणून घेतली आणि घरी कुणी नसताना वेळ साधून डल्ला मारला.
प्रकरण पाच
दोन आठवडे लंडनला मुलाकडे जातेय असं सांगणाऱ्या स्टेटस अपडेटचा फायदा घेत चोरट्यांनी घर साफ केलं.
आपल्याकडे आणि परदेशात घडलेली ही उदाहरणं खूपच बोलकी आहेत. यामुळे तरी सोशली अति अॅक्टिव्ह असणाऱ्यांचे डोळे खाडकन उघडतील असं वाटतं. सध्या सुट्ट्यांचा मोसम आहे. सुट्टीसाठी बाहेरगावी जाताना, कामासाठी दौऱ्यावर जात असताना अनेकांना विमानतळ, रेल्वे स्टेशनच्या नावाने फेसबुकवर चेक इन करण्याची सवय असते. मात्र हीच गोष्ट त्यांच्यासाठी घातक ठरु लागलीय. या पोस्टच्या माध्यमातून आपण चोरांना क्लू देत असल्याचं अनेकांच्या लक्षातच येत नाही.
खास करून उन्हाळ्यामध्ये शाळांना सुट्ट्या असताना असे चेकइन्स, फोटो अपलोड करत गावाकडची मज्जा सोशल करणारे अनेकजण फेसबुकवर दिसतात. त्यामुळेच उन्हाळ्यात अशी डिजिटल हेरगिरी करून चोऱ्या होण्याचे प्रकार वाढलेत असं सायबरतज्ज्ञ सांगतात. म्हणून उगाचच ट्रिपच्या ठिकाणाहून चेक इन करणं, फोटो अपडेट करणं शक्यतो टाळावं. तर हे स्मार्ट चोर तुमच्या घरांपासून लांब राहतील, असं 'रिस्पॉन्सीबल नेटिझम'चे उन्मेश जोशी यांनी सांगितलं.
स्टेटस अपडेट टाळा
आजकालचे चोर खरोखरच स्मार्ट झाले आहेत. तुमच्या सोशल प्रोफाइलवर त्यांची नजर आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे पर्यटनस्थळी असताना तिथून फोटो आणि स्टेटस अपडेट करणं टाळा. घरी आल्यावर निवांतपणे ते करता येईल. तुम्ही घरी नसताना तुमचं सोशल अकाऊंट चोरांसाठी आमंत्रण ठरेल अशी कोणतीही पोस्ट करणं टाळा.

29/01/2015

शुभ्र दही पाहिलं कि तोंडाला पाणी सुटत , खायचा मोह होतो . पण
चमचा बुडवला , कि दही मोडणार, थोड्या वेळाने , चोथा पाणी होणार,
हे ठरलेलं ! पण म्हणून मी ते मोडलच नाही तर ? At the end of the
day , ते आंबट होऊन जाईल . अजून काही दिवस तसच ठेवलं , तर खराब
होऊन जाईल . मग उपयोग काय त्या perfectly set
झालेल्या दह्याचा ?
मनात विचार आला , आयुष्याचही असच असत नाही का ? दह्यासारख
'set ' झालेलं आयुष्य नक्कीच आवडेल ! पण ते आयुष्य तसच set राहील
तर त्यातली गोडी निघून जाईल . वायाच जाणार ते.
त्यापेक्षा रोजच्या रोज , आयुष्याच नवीन दही विरजायचं .
आयुष्याची गोडी चाखायला तर हवीच ! आयुष्य जगायला तर हवच !
दिवसभर ते दही वेगवेगळ्या form मध्ये अनुभवायचं ! कधी साखर घालून ,
तर कधी मीठ , कधी कोशिम्बिरीत , तर कधी बुंदित, तर
कधी कोणत्या ग्रेव्हीत ! कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून !
मला न, ह्या ताकाचा , हव तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म
फार आवडतो . अर्थात , कुठचाही अतिरेक झाला तर आयुष्य पांचटच
होत ! हरेक दिवसाच्या recipe ची नजाकत वाढवता आली पाहिजे.
मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा ! पूर्ण दही संपवायच्या आधी ,
रोज थोड विरजण , बाजूला काढून ठेवायचं ! 'उद्याचं ' दही लावायला !
मग रात्री झोपण्यापूर्वी , दिवसभरात जगलेल्या lukewarm क्षणांनी ,
परत नव्यानं दही विरजायच .
माहित आहे , रोज हि भट्टी जमेलच असं नाही . पण नासलच
समजा कधी , कडवट झालंच समजा कधी , तर नाउमेद न होता , नव्यानं
सुरुवात करायची . मग त्या करता दुसऱ्या कडून विरजण मागायची वेळ
आली तरी त्यात कमीपणा नसतो .
पण 'दही' मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं !

03/01/2015

सावित्रीबाई फुले

(जन्म : नायगाव-सातारा जिल्हा,
जानेवारी ३, इ.स. १८३१ मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

🔹चरित्र

सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. इ.स. १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.(यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तरी भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून मार्च १०, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले . दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या.

सत्कार

पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही. सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.

सावित्रीबाईची प्रकाशित पुस्तके

काव्यफुले (काव्यसंग्रह,१८५४)
मातोश्री सावित्रीबाईंचे भाषणे व गाणी (१८९१)

barobar ahe na...........?
26/09/2014

barobar ahe na...........?

आषाढी एकादशीचे महत्त्व-----------------------------------------------------------------------------------------आषाढी एका...
08/07/2014

आषाढी एकादशीचे महत्त्व
-----------------------------------------------------------------------------------------
आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी' म्हणण्याचे कारण : मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी' (देवांच्या निद्रेची) एकादशी', असे म्हणतात.
आषाढी एकादशीचे महत्त्व : देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते.
पूजाविधी : या दिवशी श्रीविष्णूची `श्रीधर' या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.
पंढरपूरची वारी : वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे.
हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो.महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातूनठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
आषाढीच्यावारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो ववर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरीवारकरीप्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो.
पौराणिककाळी मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराची आराधना करून ''तुलाकोणाकडूनही मृत्यू येणार नाही. फक्त एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल''असा वर मिळतो. त्यामुळे उन्मत होऊन मृदुमान्य राक्षस देवांवर स्वारी करतोव त्याचा पराभव करतो. सर्व देव पराभूत होऊन एका गुहेत लपतात. त्याच वेळीएकादशी देवतेचा जन्म होतो व ती मृदुमान्य राक्षसाचा नाश करून देवांचीमुक्तता करते. त्यावेळी पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांचे स्नान होते वगुहेत असल्यामुळे उपवासही घडतो. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवासम्हणून करण्याचा प्रघात पडला.
परस्परावर प्रेम करणे, प्राणीमात्र,अपंगावर प्रेम करणे, गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो.हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे.
सर्वेपि सुखिन: सन्तु ।
सर्वे सन्तु निरामया ।
सर्वे म्रदाणि पश्यन्तु ।
मा कश्चिद दु:खमाप्नुयात ।।

Hows it???
13/04/2014

Hows it???

Address

COVAS Parbhani
Parbhani
431402

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वृंदावन हॉस्टेल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category