29/01/2015
शुभ्र दही पाहिलं कि तोंडाला पाणी सुटत , खायचा मोह होतो . पण
चमचा बुडवला , कि दही मोडणार, थोड्या वेळाने , चोथा पाणी होणार,
हे ठरलेलं ! पण म्हणून मी ते मोडलच नाही तर ? At the end of the
day , ते आंबट होऊन जाईल . अजून काही दिवस तसच ठेवलं , तर खराब
होऊन जाईल . मग उपयोग काय त्या perfectly set
झालेल्या दह्याचा ?
मनात विचार आला , आयुष्याचही असच असत नाही का ? दह्यासारख
'set ' झालेलं आयुष्य नक्कीच आवडेल ! पण ते आयुष्य तसच set राहील
तर त्यातली गोडी निघून जाईल . वायाच जाणार ते.
त्यापेक्षा रोजच्या रोज , आयुष्याच नवीन दही विरजायचं .
आयुष्याची गोडी चाखायला तर हवीच ! आयुष्य जगायला तर हवच !
दिवसभर ते दही वेगवेगळ्या form मध्ये अनुभवायचं ! कधी साखर घालून ,
तर कधी मीठ , कधी कोशिम्बिरीत , तर कधी बुंदित, तर
कधी कोणत्या ग्रेव्हीत ! कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून !
मला न, ह्या ताकाचा , हव तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म
फार आवडतो . अर्थात , कुठचाही अतिरेक झाला तर आयुष्य पांचटच
होत ! हरेक दिवसाच्या recipe ची नजाकत वाढवता आली पाहिजे.
मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा ! पूर्ण दही संपवायच्या आधी ,
रोज थोड विरजण , बाजूला काढून ठेवायचं ! 'उद्याचं ' दही लावायला !
मग रात्री झोपण्यापूर्वी , दिवसभरात जगलेल्या lukewarm क्षणांनी ,
परत नव्यानं दही विरजायच .
माहित आहे , रोज हि भट्टी जमेलच असं नाही . पण नासलच
समजा कधी , कडवट झालंच समजा कधी , तर नाउमेद न होता , नव्यानं
सुरुवात करायची . मग त्या करता दुसऱ्या कडून विरजण मागायची वेळ
आली तरी त्यात कमीपणा नसतो .
पण 'दही' मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं !