03/03/2026
जयहिंद
भारत सरकारने चुकीची माहिती देणाऱ्या टीव्ही चॅनल्सवाल्यांवर देशहितासाठी त्वरित नियंत्रित आणणे गरजेचे...
👉छोट्या छोट्या गोष्टींनासुध्दा ब्रेकिंग न्यूज म्हणणे.
👉महायुद्ध ही हेडलाइन दाखवून वातावरण तणावाचे करणे .
👉बातम्या सांगताना सायरन आणि भयंकर भीतीदायक आवाज वापरणे.
👉तीच तीच बातमी पुन्हापुन्हा सांगून भीतीचे वातावरण निर्माण करणे.
👉ए आय निर्मित व्हिडीओ दाखवून लोकांच्या मनात भय उत्पन्न करणे.
👉त्याच त्याच बातम्या, तेच तेच व्हिडीओ पुन्हा पुन्हा दाखवणे.
👉न घडलेल्या खोट्या गोष्टी खऱ्या आहेत असे भासवणे .
👉ज्ञान नसलेल्या राजकीय व्यक्तींकडून युद्धावर चर्चा करवून, त्यामध्ये वाद विवाद उत्पन्न वातावरण बिघडवणे.
👉स्वतःच जज्ज होऊन होत असलेल्या घडामोडींवर तर्क काढून रिकामे होणे.
👉वेगवेगळ्या अफवा पसरवून दहशत निर्माण करणे.
तसेच टीव्ही चॅनेल्समध्ये कोण श्रेष्ठ आणि पहिली बातमी कुणी दाखवली, यासाठी ज्या प्रकारे युद्ध चालू आहे, ते देशाला आणि नवीन पिढीला फार घातक ठरत आहे. या टीव्ही चॅनेल्सवाल्यांनी अक्षरशः हैदोस घातला आहे.
कोरोना जसा टीव्ही चॅनल्सवरील चुकीच्या बातम्यांमुळे वाढला,
त्या प्रमाणे आत्ता चुकीच्या पद्धतीने बातम्या देणाऱ्या टीव्ही चॅनेल्समुळे न होणारे महायुद्धसुध्दा होऊ शकते आणि आपला भारतसुद्धा त्यात ओढला जाऊ शकतो.
टी आर पी साठी हे सर्व भयंकर उद्योग अनेक टीव्ही चॅनल्स करीत आहेत आणि याचे दुष्परिणाम भारताचे जागतिक संबंध, आणि जनतेच्या मानसिकतेवर फार मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
खर तर या पद्धतीने बातम्या सांगणे हे कोणत्याच नीतिमत्तेला धरून नाही .
तरी भारत सरकारने सर्वच क्षेत्रातील बातम्यांबाबत म्हणजे राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, युद्ध, आंतरराष्ट्रीय चुकीच्या पद्धतीने आणि खोट्या बातम्या सांगणाऱ्या चॅनल्सवर त्वरित नियंत्रण आणणे भारताच्या भविष्यासाठी अंत्यंत महत्वाचे आहे.
तसेच योग्य, खात्रीशीर बातम्या लोकांपर्यंत पोहचण्यासाठी विश्वासार्ह चॅनल्सची यादी जाहीर करावी,जेणेकरून लोकांमध्ये नाहक निर्माण होणारी भीती आणि ताण कमी होईल.
🙏
राजेंद्र चोरगे
श्री बालाजी ट्रस्ट
सवयभान सातारा